* नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी.
*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे.
*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मुलांना शैक्षणिक शुल्क माफ करावे.
*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खत आणि बियाण्यांची खरेदी करण्यासाठी विशेष अनुदानाची घोषणा करावी.
* पुराच्या पाण्यामुळे घरांची पडझड व झालेली नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित 25 हजारांची मदत करावी.
गडचिरोली/16:- गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. विविध ठिकाणी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.दुबार पेरणीचे संकट आले असल्याने बळीराजाला दिलासा देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करिता शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांच नुकसान भरपाई देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट गडचिरोली यांनी केली.
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करित त्यांना मदत स्वरुपी 20, हजार रुपयांचे त्वरित पॅकेज देऊन दिलासा द्यावा.तसेच ज्या लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे.असे लोकांना तात्काळ 25, हजार रुपयांची मदत राज्य सरकारकडून देण्यात यावी.ओला दुष्काळ दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे.त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.तसेच अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना आगामी काळात खत आणि बियाण्यांची खरेदी करण्यासाठी विशेष अनुदानाची घोषणा करण्यात यावी.अशी मागणी देखील जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट गडचिरोली यांच्याकडून करण्यात आली आहे.
0 Comments