गडचिरोली:- मनोज राजुरकर हे व्यवसायाने छोटे ठेकेदार होते . त्यांनी ११ चे सुमारास कठानी .नदिवर जावून पुलावरून उडी घेतली . तसा कठानी .नदिला पुर आला होता . परंतु पुलावर पाणी नव्हते परंतु गडचिरोली वरुन कठाणी नदिवर जानांना त्यापूर्वीच रोडवर पाणी होते त्यामुळे काल तर नदीघाटा वर जाणे मुस्कील होते . वैनगंगा नदीच्या दाबामुळे कठानी फूल वाहत असते . आज दि. ११ ला दुपारी १२ वाजता मनोज राजुरकर कठाणी नदिवर गेला व पुलावरून उडी घेतली . त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे . सदर घटना घडताच गडचिरोली ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहचले . परंतु त्याचा मृत्युदेह बातमी लिहे पर्यत सापडला नाही . तो वैनगंगा नदित जावून पुढे चामोर्शी पर्यत मृत्युदेह हाती लागणारही नाही . असे लोकांचे म्हणणे होते . त्यांनी आत्महत्या केली तर का केली असावी . मृत्युदेह पोलिसांच्या हाती लागल्या नंतरच उलघडा होवू शकतो . परंतु मनोज हा मनमिळावू स्वभावाचा होता . त्यामुळे त्यांच्या दुदैवी मृत्युने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक.
(EDITOR IN CHIEF)
0 Comments